…तर हा माणूस दररोज सकाळ-संध्याकाळ एकच अंडं खायचा. त्याच्यावरतीच
त्याचा संसार चालायचा. फिक्कट निळा पुर्ण बाह्यांचा शर्ट आणि त्यावरती गर्द निळी पॅण्ट,
असा साधारण त्याचा वेश, दररोज ठरलेला असायचा. कधी-मधी पांढरा शर्ट घालायचा, आय़ुष्यात
विशेष काही बदलायचं नाही. लांबून बघितलं तर वाटायचं की रंजला-गांजलेला दिसतो बुवा,
मनात मोठं दु:ख जगतोय; काहीतरी आतल्या आत खात असेल त्याला, म्हणून असा खंगल्यासारखा
दिसतोय, एकाच अंड्यावर जगतोय. तो सरकारी किंवा बॅंक कर्मचारी नव्हता, लेखक किंवा कलाकार
नव्हता; तो चतुर्थ श्रेणी कामगार नव्ह्ता की कुठल्या कंपनीचा मालक नव्हता. पण त्याचं
एवढसं वर्णन सांगितलं तरी वाटायचं की या चार-पाच ओळखी असाव्यात त्याच्या. त्याच्या
कामाशी तसा काही आपल्याला मतलब नाही. त्याचा वर्ण? कसा असावा वाटतं तुम्हाला? काळा,
सावळा, गोरा? त्याची अंगकाठी? बारीक, मध्यम, स्थूल. त्याची उंची? ठेंगणा, मध्यम, उंच.
त्याचे केस? त्याचे डोळे? त्याचं बोलणं? त्याचं जग?
तोडक्या-मोडक्या माहितीवरून एवढ्या लांबवरचा पल्ला गाठायचा
म्हणजे सोप्पे काम नाही. म्हणून मग एखादा चालता-बोलता माणूस पकडायचा आपल्याच जगातला.
जिवंत, मृत, किंवा आठवणीतला. आपलं मन, आपला मेंदू किती copy paste करत असेल याचा आपल्याला
काहीच थांगपत्ता लागत नाही, generally. तर हा माणूस, जो फक्त एकच अंडं सकाळी आणि संध्याकाळी
खायचा, काय असेल त्याची story? कुठे धडपडला असेल, कुठे ठेच लागली असेल, की नेहमीप्रमाणे
मागल्या आयुष्यात चुकांचं सारवण घातलं असेल? जे सोयीस्कर, जे वाटतं मनाला छान, ते चिकटवावं
आयुष्य आपण आपल्या कागदावरच्या व्यक्तीला.
मग असं सगळं खोटं-नाटं करून कशाला लिहीत बसायचं त्यावर?
Timepass म्हणून? की स्वत:ला विचारांत झोकून देण्यासाठी? त्या गर्द गार समुद्रात विचारांच्या,
असंख्य अशे अद्भुत आणि अनामिक तळ शोधण्यासाठी. मग हा एकच अंडं खाणारा माणूस का? तुमच्या-माझ्या
पायातला surfing board म्हणून अशाच व्यक्ती उपयोगी पडतात. ते unexplored तळ शोधताना
स्वत:चा श्वासही घुसमटतो आणि नकळत त्या लिखानाची नशा भिनत जाते शरीरात. मारलेल्या त्या
लांबलचक सूरात, भेटतात अजून कित्येक लोक, प्रसंग, भावना, आणि शब्द. त्या दुर्गम भागात
अन्नसाखळी असते आणि त्याचा आपणही असतो एक घटक. कधी त्या अन्नसाखळीच्या पिरॅमिडच्या
टोकाला, कधी पायथ्याला, कधी सॅण्ड-विच्ड, तर कधी मृतजीवी म्हणून. कुठे का असेना, आपणही
असतो एक भाग त्यांच्या जगाचा.
तर तो एकच अंडं खाणारा माणूस. या एका ओळीतून कीव व्यक्त होते
का? की रहस्यमय कथा वाटते? असं पण वाटतं की मारलाय टोमणा. लिहीण्याची भाषा आणि व्यक्त
होणारी भावना, यांचा ताळमेळ नाही जुळला की होतो तो हशा. आता तळ गाठून मी परतीचा प्रवास
केलाय सुरू. त्याच त्या व्यक्तीला पकडून उलट्या दिशेने. त्याच्या भूतकाळात डोकावून
पाहताना किती सुंदर गोष्टी दिसतात, पण आपण करायचा कानाडोळा. कारण आपल्या पांढऱ्या कागदावर
ती व्यक्ती बनवायचीय नैराश्यमय. आपण त्या ओळींमधे पकडतोय का पात्रांची जगं? एवढ्या
कमी अवधीत नसेलही शक्य, पण तो एकच अंडं खाणारा माणूस डोक्यात जसा बनलाय हाडामांसाचा
तसाच उतरलाय का कागदावर याचं प्रामाणिक उत्तर सापडणं अशक्यच!
कसे लिहावे बरे? बरं लिखान तसं सोप्पच! थोडे-थोडे शब्द गोळा करावेत. कशाला काय जोडायचे याची मनातच करावी मांडणी. आणि सर-सर सारे ओतावेत शब्द कागदावर. ओतण्याची पण एक कला आहे. ज्याला जमली त्यालाच माहिती की ती जादू कशी घडते!
ओतावेत शब्द कागदावर आणि हळूवार मारावी एक फुंकर अनुभवाची, मग पसरतात ते आपोआपच; जसा पसरतो जमिनीवर ओतलेला पारा! आपोआप, नेमके, अर्थपुर्ण. असे जमले प्रकरण की कशाला त्यांना हलवायचे? जे आहे ते तसेच ठेवायचे आणि दुरून थोडे बारकाईने बघायचे.
वाटतं मग, अरे हा एक शब्द फारच अवखळ, पसरलाय कागदभर, तर हा दुसरा अगदीच लाजाळू. वाटतं, अरे ही काही वाक्यं आगगाडीसारखी लांबडी, तर काही अगदीच झालीत पोरकी! वाटतं असंही की काही जमलं नाही हे चित्र चांगलं, करावा कागदाचा बोळा; तर कधी (क्वचितच बरं का) वाटतं, जमलंय बरं का!
काही का वाटेना; आताशा मनातलं कागदावर येणं हीच केवढी मोठी प्राप्ती! काही शब्द असावेत खिशात पांढरे-काळे, रंगी-बेरंगी; काही वाक्यं बनवावीत लहान-मोठी, सुरेख नि वेढब. कोऱ्या कागदावरती चित्र मात्र रेखाटताना मनाशीच जुळवावं एक गाणं, आणि एक ललित जन्माला घालावं तान्हं.
कधीवाटतंघरातएवढ़्ढंआपणकधीचराहिलोनव्हतो. अतिशयजास्तघरातराहूनलोकांविषयीअतीचमाहितीमिळतेकीकायअशीधास्तीवाटते. Personal
space जपलेली, हळूहळूउद्धस्तहोतेयकीकायअशीशंकानिर्माणहोतेय. ज्यांनायागोष्टीकधीझेपल्यानाहीत, त्यांनातसाहीकाहीफरकपडतनाहीत. पणआताशाघरातल्यासर्वांच्याचझोपण्या–उठण्याच्यावेळा, जेवणाच्यावेळाआणिजेवणातलेमेन्यु, स्वभावआणिपादण्याच्यापोझिशन्सआणिनादयांचाइत्यंभूतडेटाबेसडोक्याततयारहोतचाललाय. हेअसंमाणसांचंजगअति–जवळआलंकीत्यातकसंरहावंहेउमजणंहीखरीएककलाआहे, पणमलाञातनाही. मीहेजगबघतोय, अनुभवतोय!
एकमात्रखरेकीशनिवार–रविवारच्याचक्रातूनहाजीवमुक्तआहे; आतादररोजचमंगळवारकिंवागुरूवारअसाकाहीसाअसतो. तारीखआणिजगातल्यामृतांचाआकडायादोन्हीसंख्यांवरचीअंधश्रद्धामीझटकूनदिलीयआणिबिना–तारखांच्याआणिबिना–वाराच्याकाळाच्याअक्षावरूनप्रवाससुरूझालायखरा! याअक्षावरतीडेडलाइन्सचेगतिरोधकआहेतजिवंत, पणत्याप्रवाशीमनालासण–समारंभाचेअप्रूपनाहीआणिहार–तुऱ्यांचीआसनाही!
दररोज ढिगभर ऑनलाईन मिटींग्ज आहेत, पण माईक आणि व्हिडीओ स्विच ऑफ करून सच्चिदानंदी
टाळी लागण्याची सोयही आहे. आळसाचं जेनेसिस खरंतर न आवडणाऱ्या गोष्टी वेळेत करण्याशी
आहे!
तुझ्या चांगल्या वाईट सवयींचा
ठिकाणा हळूवार हरवत चालल्यासारखा होत असताना, मी आताशा घराचे दार उघडून आत पाय ठेवला
तर हवेचा थर तिथल्या तिथे. हालचाल नाही, रंग नाहीसे. अंधाऱ्या रात्री, मिणमिणत्या प्रकाशात,
गच्च पावसात, आभाळ उतरण्याची वाट पाहत आडोश्याला बसलेल्या साठीच्या तेलकट चेहऱ्याच्या
माणसासारखं घर बसलेलं असतं, गच्चीतून तोंड काढून रस्त्याकडे बघत…तुझी वाट बघत!
मी गाडीच्या चाव्या खिळ्याला
अडकवतो, खिशातलं पाकीट ड्रॉवरवर मधे ठेवतो. खांद्यावरचं ओझं खुर्चीवर ठेवतो आणि गच्चीत
येऊन उभा राहतो. सात किंवा असे काहीतरी वाजलेले असतात. लोकं दिसतात…घरा-घरांत खुर्च्यांवर
बसलेली, बसवलेली; चहा पिणारी; टिव्ही बघणारी; येणारी-जाणारी; चित्रातल्यासारखी. तू
नाहीस दिसत. घर घरात जाऊन बसून घेतं, करायला विशेष काहीसं नाही!
थोडं बसावं, एक-दोघांना
फोन करून उगाच त्रास द्यावा, कामाचं बोलावं. करमेनासं होतं. पक्षी आढळत नाहीत, भिंतींवर
अडकवलेले तुझे-माझे फोटोजही बोलत नाहीत. तुझी आठवण येत नाही, त्रास होतो. घरातल्या
फरश्या दररोज मोजल्या तरी तेवढ्याच राहतात आणि तू असताना घर कसं एकदम छोटंसं वाटतं
तेही उमगत नाही! मी घर आवरून ठेवतो. तुला चांगलं वाटेलंसं ठेवतो.
पाऊस थांबल्यासारखा साठीचा
म्हातारा, माझ्याजवळ येऊन बसतो. आम्ही एकमेकांकडे बघतो. मी आम्हा दोघांच्या पेल्यात
मद्याचे पेग भरतो, चिअर्स करत नाही, निमित्त नसतं. घरातला प्रकाश मंदावतो, मी नोराह
जोन्सची गाणी लावतो. आम्ही दोघेही पुन्हा गच्चीत जाऊन उभे राहतो, तोच तो रस्ता बघतो,
आकाशात चंद्र चढलेला असतो. घराला एक आणि मला एक दीड-फुटाची फरशी एवढीच गरज उरते…बाकी
उरतो तो निव्वळ पसारा!
गोष्ट लिहायला लागलो तेव्हा
मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही.
एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त!
एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना
मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं.
ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं
जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही.
ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात
पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी
उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं
लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात
आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची
भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना
घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!